Posts

Showing posts from February, 2026

**बावनकशी नाट्यकलाकृती ‘ संगीत संत तुकाराम ‘

मराठी साहित्यसृष्टीत संगीत नाटकाची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘ संगीत सौभद्र ‘, ‘ सं . शाकुंतल ‘ पासून सुरू झाली ;आणि संगीत नाटकाचे एक पर्व मराठी नाट्यक्षेत्राला अनुभवायला मिळाले . संगीत नाटक हे मराठी रंगभूमीला पडलेले एक पहाटेचे सुखद स्वप्न आहे . असे म्हटले जाते ते यथार्थच आहे . मराठी नाट्यसृष्टीचा हा उत्कर्षाचा काळ होता . सं . शाकुंतल, सं .सौभद्र , सं . शारदा , मृच्छकटिक, सं . स्वयंवर , सं .मानपमान , सं . संशयकल्लोळ , सं .विद्याहरण , सं . ययाति आणि देवयानी , सं . देवबाभळी , सं . चंद्रप्रिया, सं . संत तुकाराम आदी नाटकामुळे मराठी रंगभूमीला ‘ सुवर्णयुग ‘ प्राप्त झाले . संगीत नाटकाच्या याच परंपरेतील संगीत संत तुकाराम ह्या अक्षर नाट्यकलाकृतीचा प्रयोग छ . शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘ नाथ प्रतिष्ठान ‘ , परळीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता .परळीकर रसिक प्रेक्षकांसाठी ही एक अप्रतिम मेजवानी होती . ‘कसदार अभिनय दमदार अभंग , नाट्यगीतांचा देखणा नजराणा ‘, त्याचबरोबर भक्ती -शक्तीचा अनुपम आनंद सोहळा या कलाकृतीच्या माध्यमातून अनुभवता आला. त्यामुळे आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . ...

सुंदर व सुबक आणि मूल्यात्मक गुणांनी युक्त असलेली 'शब्दवेली '

साहित्याचा संसार भावनेवर आधारित असतो.शब्द हे त्याचे माध्यम असतात.ते माध्यम आशयाला प्रभावीपणाने पुढे घेऊन जात असतील तर निश्चितच साहित्य हे 'सौंदर्य'मूल्याने विणटलेलं असते.प्रभावी शाब्दाविष्काराने बहरलेली 'शब्दवेली' रसिकमनाला मोहित करते. त्या शब्दवेलींचे आकर्षण प्रत्येकालाच वाटते.अगदी अलीकडेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने संपादित केलेले व आदित्य प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेले 'शब्दवेली ' हे पुस्तक असेच सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरताना दिसत आहे. त्यास शब्दवेलीतील विविध प्रवृत्तीचे वेचे ,वैविध्यपूर्ण कविता व मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत केलेली आखीव- रेखीव संरचना आणि बांधणी हे घटक कारणीभूत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या बी.ए./बी.एस्सी./ बी.कॉम./बी.एस.डब्ल्यू व बी.एफ.ए.द्वितीय वर्षाच्या तृतीय व चतुर्थ सत्रातील अभ्यासक्रमाकरिता संपादित केलेले हे पुस्तक.त्यात जुन्या व नवीन लेखक कवींच्या रचनांचा सुंदर समन्वय साधलेला आहे.श्रममूल्य,लोकशाही मूल्य,वैज्ञानिक जाणिवा याबरोबरच अन्य जाणिवांचा स...

आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले पिताजी - किशनराव यल्लावाड

"एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे " असं सुप्रसिद्ध कवी गदिमांनी मानवी जीवनाचे वर्णन केले.अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसं आयुष्याची नाव पुढे वल्लवत ठेवण्यापेक्षा रडगाणं गात बसतात;पण संघर्ष करणारी माणसं त्या प्रतिकूल परिस्थितीवर स्वार होण्याचा प्रयत्न करतात हेही तितकेच सत्य आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे वडील स्व. किशनराव यल्लावाड हे होत.हलाखीच्या परिस्थितीमुळे स्वतःला शिक्षण घेता आलं नाही.निरक्षरतेचा शाप घेऊन उभं आयुष्य काढत असताना अनेक संकटं आली;पण त्या संकटाला न घाबरता पुढे जात परिस्थितीशी दोन हात करणारे आणि आपल्याबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जात जात मदत करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. "आम्ही शिकलो नाही म्हणून आमच्या वाट्याला दुःख आलं;पण तुमच्या वाट्याला दुःख येऊ नये यासाठी तुम्ही शिका रे बाबांनो ...शिकलात तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल."अशी भूमिका घेऊन ते सदैव आम्हाला शिक्षणासाठी उद्युक्त करत असत.अंगावर पुरेशी वस्त्र नाहीत ... धोतराला बांधलेल्या गाठी ,दारिद्र्य पाचवीला पुंजले...

मराठी भाषा व अर्थार्जन

*भाषा संचालनालय ,महाराष्ट्र शासन* व *वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा जि.बीड* यांच्या संयुक्त विद्यमाने *मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा* निमित्त विशेष व्याख्यान विषय - *मराठी भाषा :रोजगार संधी* वक्ते - प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय,परळी वैजनाथ आदरणीय व्यासपीठ ,व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व व्यासपीठासमोरील बंधू भगिनी ... ...... . . . . . ...... ...... "दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला , तारे फुलले , रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली . " कवीवर्य नारायण सुर्वे म्हणतात त्याप्रमाणे आम्ही भाकरीचं वर्तुळ सांधण्यामध्ये उभं आयुष्य खर्च करत असू तर आयुष्य सजवायचं कधी आणि फुलवायचं कधी हा प्रश्न तरुणांना पडल्याशिवाय राहणार नाही. अलीकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये पदव्याची भेंडोळी घेऊन बेकारीचा शिक्का माथी मारला जातोय.कविवर्य अर्जुन डांगळे यांच्या शब्दात सांगायचे म्हटले तर - "जगत आहोत हे जिणे जगावे ...

सुधारणा ' प्रथम पुरुषी ' बनावी

माणसाच्या जीवनात सुखाचे क्षण येतात तसे दुःखाचेही येतात.किंबहुना सुखापेक्षा दुःखाचीच अनुभूती जास्त प्रमाणात येते.अगदी गदिमांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर - " एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे . " असा प्रत्यय सदैव येत असतो ;पण आपल्या या आयुष्यावर निराशावादाची काजळी न चढू देता ती घासून पुसून आयुष्य प्रकाशमान करता येते.त्यासाठी गरज असते प्रयत्नांची,जिद्दीची,सकारात्मक दृष्टिकोनाची,स्वतःपासून बदल घडविण्याच्या वृत्तीची .... तर नक्कीच सर्वत्र - 'आनंदी आनंद गडे ,जिकडे तिकडे चोहीकडे ' हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही .... पण आमचं बदलाचं घोडं आडतं ते स्वतःजवळच !बदल सर्वांना हवा असतो अर्थातच सुधारणा सर्वांना हवी असते ;पण ती नेमकी करायची कोणी ? इथे प्रत्येकजण या सुधारणेची अपेक्षा दुसऱ्याकडून करतो.व्याकरणाच्याच भाषेत सांगावयाचे झाले तर सुधारणा ही नेहमी ' द्वितीय पुरुषी ' असते . छ.शिवाजी महाराज जन्मावेत ;पण ते आपल्या घरात नव्हे तर दुसऱ्याच्या घरात या मनोभूमिकेमुळे आमचा विकास म्हणावा तसा होत...

नव्वद नंतरचे मराठवाड्यातील कथा साहित्य

*प्रास्ताविक* : - १९९०-९१नंतर मराठी ग्रामीण साहित्यात पृथगात्म जाणिवा येऊ लागल्या . कारण १९९१ला 'गॅट ' करारानुसार भारताने जागतिकीकरण स्वीकारले. ' खाऊजा ' संस्कृती येथे उदयाला आली . त्याचा परिणाम ग्रामीण जीवनावरही झाला . या संस्कृतीमुळे ग्रामीण जीवनात चांगले कमी व वाईट परिणाम जास्त झाले . देशी -विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी शेतकऱ्याच्या जमिनी काबीज केल्या , शेतकरी भूमीहीन होऊ लागला ,दलालाकडून शेतकऱ्याची फसवणूक झाली, शेतीमालाला मिळणारा अल्प भाव , वाढती महागाई ;खत, बी -बियाणे, फवारण्या यामुळे शेतीतील वाढलेला खर्च व उत्पादन यातील तफावत , वाढती बेकारी, लोडशेडिंग , गावातील बदलते राजकारण , नीतिमूल्याचा घसरलेला दर्जा , भूक अशा विविध पातळ्यावर ग्रामीण माणसाला संघर्ष करावा लागू लागला . 'खाऊजा ' संस्कृतीने निर्माण केलेल्या समस्या व काही समकालीन जाणिवा १९९१नंतरच्या ग्रामीण साहित्यातून आविष्कृत केल्या जाऊ लागल्या. ग्रामीण कथा, कविता , कादंबरी व अन्य वाङ्मयप्रकारातही याचे प्रतिबिंब दिसते .१९९१नंतर जुन्या पिढीतील लेखक कवी बरोबरच नव्या पिढीतील कवी लेखकांनी समकालीन वा...

पर्यावरण व संत श्री तुकाराम महाराज

संत तुकारामा महाराजांची अभंग गाथा ही एक जीवनाची पथदर्शी गाथा . . .जगण्यासाठीचा एक आश्वासक सूर . . .आमच्या दैनंदिन जीवन व्यवहारातील . समस्या आणि त्यावरील उत्तर संत साहित्यात सापडतं आणि सापडतंच . . .संत ज्ञानेश्वर, संत नामदेव ,संत एकनाथ , संत गोरा कुंभार, संत सावता माळी , संत नरहरी सोनार ,संत चोखामेळा ,संत सेना न्हावी आदीसारख्या संतांच्या रचना मानवी जीवनातील विविध समस्यांचे निरसन करण्यास उपयुक्त ठरतात. संत तुकारामांचे अभंग हे तर विविध अंगाने सजलेले ,नटलेले व मानवी जीवनातील विविध जाणिवांचा आविष्कार करणारे आहेत.सामाजिक समता,अंधश्रद्धा निर्मूलन ,अर्थविचार ,कृषिविचार अशा विविध अंगाचा विचार त्यातून आपल्याला घेता येतो.पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टीनेही संत तुकारामांचे अभंग महत्त्वपूर्ण ठरतात.वास्तविक जीवन जगत असताना आम्ही आमच्या सुखासाठी निसर्गाचं नैसर्गिक निसर्गत्व हिरावून घेतो आहोत किंबहुना निसर्गावर घाला घालून अप्रत्यक्ष आमच्यावरच तो घाला घालतो आहोत.प्राणिमात्राकडून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साइड हे वृक्ष शोषून घेतात आणि आम्हाला आवश्यक असलेला ऑक्सिजन वायू देतात.अलीकडच्या काळात आम...

प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा

महाराष्ट्र ही साधुसंतांची समाजसुधारकांची भूमी ...या भूमीला शूर - वीरांची भूमी म्हणूनही ओळखले जाते.राकटपणा ,कणखरपणा , कोमलपणा , नाजूकपणा हा इथल्या माणसाचा स्थायीभाव.मराठी प्रदेशाचा विशेष हा येथील माणसाचाही स्वभावविशेष. . . "राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा, नाजुक देशा कोमल देशा, फुलांच्याही देशा आंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा बकुल फुलांच्या प्राजक्तींच्या दळदारी देशा " कवी गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे केलेले हे वर्णन मराठी मनाला मोहविणारे आहे. 'मंगल देशा पवित्र देशा।' अशीही या प्रांताची महती गायलेली आहे.ती केवळ या प्रांताला मांगल्यरूप प्राप्त करून देणाऱ्या माणसामुळेच ... महाराष्ट्राला स्वतंत्रतेचं, पावित्र्याचं, विकासाचं रूप प्राप्त करून देण्यात अनेकांचा त्याग, बलिदान या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्या नजरेआड करुन चालत नाहीत. आज आनंदोत्साहात १ मे हा 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा करतो. तो साजरा करताना योगदान दिलेल्या महान विभुतींचे स्मरण करणे आमचे आद्यकर्तव्य ठरते. “इतिहासाची पाने चाळताना १०६ आ...

वारीच्या वाटचालीतील समान दुवे

पंढरीचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. . . आषाढी - कार्तिकीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तगण सखा पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरीला निघालेले असतात.श्वास विठ्ठल,ध्यास विठ्ठल हाच त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव बनलेला असतो. "पंढरीशी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा ॥ नलगे त्यावीण सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥ पांडुरंगाच्या भक्तीतून पांडुरंगाच्या भेटीची असीम ओढ या मनाला लागलेली असते.पांडुरंगाची भेट हाच सुख सोहळा ही मनोभूमिका बनते आणि त्याच मनोभूमिकेतून हे भाविक भक्त वारीला निघतात. आषाढी - कार्तिकी निमित्त महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पताका घेऊन पंढरीच्या दिशेने आगेकुच सुरू होते.त्यात आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहूहून संत तुकारामांची पालखी ,पैठणहून संत एकनाथांची पालखी ,नरसी बामणीहून संत नामदेवांची पालखी ,गंगाखेडहून जनाबाईची पालखी ,शेगाव येथून संत गजानन महाराजांची पालखी अशा एक ना अनेक पालख्या काही विशिष्ट गावी मुक्काम करत पंढरीच्या दिशेने निघतात. दक्षिण काशी म्हणून पंढरपूरची ओळख ...