Posts

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )

घटक - १ ला *नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप* प्रास्ताविक - मराठी नाटकाचा विचार करू जाता मराठी नाटकाची परंपरा फार प्राचीन असल्याचा प्रत्यय येतो.अगदी भरतमुनींनी आपल्या साहित्यविचारात प्रामुख्याने नाटकाचाच विचार केला आहे.भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथाला नाटकाच्या परंपरेचा पाया मानला जातो. संस्कृत नाटके, राजदरबारातील प्रयोग आणि लोककला यांचा मराठी नाटकावर प्रभाव प्रतीती येते. आचार्य भरतमुनी यांनी मांडलेले रससूत्र हे नाटकाच्या संदर्भातलेच आहे.संस्कृत नाटकाच्या अनुषंगाने मांडलेला हा रसविचार मराठी नाटकालाही उपयुक्त ठरतो.किंबहुना मराठी नाटकाकरिता आजही या रससूत्र उपयुक्त ठरते . मराठी नाटकाचा विकास दशावतार, भारूड, कीर्तन, लावणी, गोंधळ, तमाशा, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, चित्रकथी अशा लोककला प्रकारांतून झालेला दिसतो. अर्थातच प्राचीन भारतीय नाट्यकलेशी आणि लोककलांशी ही परंपरा जोडलेली दिसते.मराठी नाट्यपरंपरेचा शोध घेताना विधीनाट्य ,संतांच्या भारुड रचना,महदंबेचे धवळे,बुकीश नाटके ,विष्णुदास भावे यांचे ओबडधोबड स्वरूपाचे नाटक असा प्रवास लक्षात घ्यावा लागतो. आधुनिक मराठी नाटकाची सुरुव...

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप (भाग - २ ) - नाट्यघटक व अभिनय

घटक - २ *नाट्यघटक व अभिनय* कथात्म साहित्यातील कथा कादंबरी या साहित्य प्रकारापेक्षा नाटकाचा पृथगात्मकतेने विचार करावा लागतो.कथात्म साहित्याचे काही समान गुणविशेष नाटकात असले तरी कथा कादंबरीपेक्षा काही वैशिष्ट्ये ही वेगळीच आहेत.संवाद हे नाटकाचे मूलद्रव्य आहे आणि संवादाच्या माध्यमातून व पात्रांच्या अभिनयातून नाट्य प्रयोग साकारत जातो.प्रयोगाच्या वेळी नाटकाच्या मुख्य घटकांबरोबरच दिग्दर्शन व दिग्दर्शक आणि प्रेक्षक व प्रेक्षागृह याचाही विचार या घटकाच्या अनुषंगाने करावा लागतो.तरच त्या नाट्यकलाकृतीचे व्यवस्थित परीक्षण परीक्षकाला करता येते.म्हणून इथे काही महत्त्वाच्या नाट्य घटकांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. *१)संविधानक* कादंबरीत व कथेत कथानक असते.नाटकातील कथानकाला मात्र संविधानक असे संबोधले जाते.संविधानक हा नाटकाचा कणा असतो.यात घटना,प्रसंग, वळणं व उत्कंठावर्धकता या सर्वांचा समावेश होतो.कथानक म्हणजे नाटकात घडणाऱ्या घटनांचा शृंखलाबद्ध क्रम जो कथेला युक्तीपूर्ण वाटचाल देतो.म्हणून नाटकांमध्ये संविधानकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. न्यायशास्त्रज्ञ ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार, "...

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप

घटक - १ ला *नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप* प्रास्ताविक - मराठी नाटकाचा विचार करू जाता मराठी नाटकाची परंपरा फार प्राचीन असल्याचा प्रत्यय येतो.अगदी भरतमुनींनी आपल्या साहित्यविचारात प्रामुख्याने नाटकाचाच विचार केला आहे.भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथाला नाटकाच्या परंपरेचा पाया मानला जातो. संस्कृत नाटके, राजदरबारातील प्रयोग आणि लोककला यांचा मराठी नाटकावर प्रभाव प्रतीती येते. आचार्य भरतमुनी यांनी मांडलेले रससूत्र हे नाटकाच्या संदर्भातलेच आहे.संस्कृत नाटकाच्या अनुषंगाने मांडलेला हा रसविचार मराठी नाटकालाही उपयुक्त ठरतो.किंबहुना मराठी नाटकाकरिता आजही या रससूत्र उपयुक्त ठरते . मराठी नाटकाचा विकास दशावतार, भारूड, कीर्तन, लावणी, गोंधळ, तमाशा, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, चित्रकथी अशा लोककला प्रकारांतून झालेला दिसतो. अर्थातच प्राचीन भारतीय नाट्यकलेशी आणि लोककलांशी ही परंपरा जोडलेली दिसते.मराठी नाट्यपरंपरेचा शोध घेताना विधीनाट्य ,संतांच्या भारुड रचना,महदंबेचे धवळे,बुकीश नाटके ,विष्णुदास भावे यांचे ओबडधोबड स्वरूपाचे नाटक असा प्रवास लक्षात घ्यावा लागतो. आधुनिक मराठी नाटकाची सुरुव...

**बावनकशी नाट्यकलाकृती ‘ संगीत संत तुकाराम ‘

मराठी साहित्यसृष्टीत संगीत नाटकाची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘ संगीत सौभद्र ‘, ‘ सं . शाकुंतल ‘ पासून सुरू झाली ;आणि संगीत नाटकाचे एक पर्व मराठी नाट्यक्षेत्राला अनुभवायला मिळाले . संगीत नाटक हे मराठी रंगभूमीला पडलेले एक पहाटेचे सुखद स्वप्न आहे . असे म्हटले जाते ते यथार्थच आहे . मराठी नाट्यसृष्टीचा हा उत्कर्षाचा काळ होता . सं . शाकुंतल, सं .सौभद्र , सं . शारदा , मृच्छकटिक, सं . स्वयंवर , सं .मानपमान , सं . संशयकल्लोळ , सं .विद्याहरण , सं . ययाति आणि देवयानी , सं . देवबाभळी , सं . चंद्रप्रिया, सं . संत तुकाराम आदी नाटकामुळे मराठी रंगभूमीला ‘ सुवर्णयुग ‘ प्राप्त झाले . संगीत नाटकाच्या याच परंपरेतील संगीत संत तुकाराम ह्या अक्षर नाट्यकलाकृतीचा प्रयोग छ . शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘ नाथ प्रतिष्ठान ‘ , परळीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता .परळीकर रसिक प्रेक्षकांसाठी ही एक अप्रतिम मेजवानी होती . ‘कसदार अभिनय दमदार अभंग , नाट्यगीतांचा देखणा नजराणा ‘, त्याचबरोबर भक्ती -शक्तीचा अनुपम आनंद सोहळा या कलाकृतीच्या माध्यमातून अनुभवता आला. त्यामुळे आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . ...

सुंदर व सुबक आणि मूल्यात्मक गुणांनी युक्त असलेली 'शब्दवेली '

साहित्याचा संसार भावनेवर आधारित असतो.शब्द हे त्याचे माध्यम असतात.ते माध्यम आशयाला प्रभावीपणाने पुढे घेऊन जात असतील तर निश्चितच साहित्य हे 'सौंदर्य'मूल्याने विणटलेलं असते.प्रभावी शाब्दाविष्काराने बहरलेली 'शब्दवेली' रसिकमनाला मोहित करते. त्या शब्दवेलींचे आकर्षण प्रत्येकालाच वाटते.अगदी अलीकडेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने संपादित केलेले व आदित्य प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेले 'शब्दवेली ' हे पुस्तक असेच सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरताना दिसत आहे. त्यास शब्दवेलीतील विविध प्रवृत्तीचे वेचे ,वैविध्यपूर्ण कविता व मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत केलेली आखीव- रेखीव संरचना आणि बांधणी हे घटक कारणीभूत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या बी.ए./बी.एस्सी./ बी.कॉम./बी.एस.डब्ल्यू व बी.एफ.ए.द्वितीय वर्षाच्या तृतीय व चतुर्थ सत्रातील अभ्यासक्रमाकरिता संपादित केलेले हे पुस्तक.त्यात जुन्या व नवीन लेखक कवींच्या रचनांचा सुंदर समन्वय साधलेला आहे.श्रममूल्य,लोकशाही मूल्य,वैज्ञानिक जाणिवा याबरोबरच अन्य जाणिवांचा स...

आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले पिताजी - किशनराव यल्लावाड

"एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे " असं सुप्रसिद्ध कवी गदिमांनी मानवी जीवनाचे वर्णन केले.अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसं आयुष्याची नाव पुढे वल्लवत ठेवण्यापेक्षा रडगाणं गात बसतात;पण संघर्ष करणारी माणसं त्या प्रतिकूल परिस्थितीवर स्वार होण्याचा प्रयत्न करतात हेही तितकेच सत्य आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे वडील स्व. किशनराव यल्लावाड हे होत.हलाखीच्या परिस्थितीमुळे स्वतःला शिक्षण घेता आलं नाही.निरक्षरतेचा शाप घेऊन उभं आयुष्य काढत असताना अनेक संकटं आली;पण त्या संकटाला न घाबरता पुढे जात परिस्थितीशी दोन हात करणारे आणि आपल्याबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जात जात मदत करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. "आम्ही शिकलो नाही म्हणून आमच्या वाट्याला दुःख आलं;पण तुमच्या वाट्याला दुःख येऊ नये यासाठी तुम्ही शिका रे बाबांनो ...शिकलात तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल."अशी भूमिका घेऊन ते सदैव आम्हाला शिक्षणासाठी उद्युक्त करत असत.अंगावर पुरेशी वस्त्र नाहीत ... धोतराला बांधलेल्या गाठी ,दारिद्र्य पाचवीला पुंजले...

मराठी भाषा व अर्थार्जन

*भाषा संचालनालय ,महाराष्ट्र शासन* व *वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा जि.बीड* यांच्या संयुक्त विद्यमाने *मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा* निमित्त विशेष व्याख्यान विषय - *मराठी भाषा :रोजगार संधी* वक्ते - प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय,परळी वैजनाथ आदरणीय व्यासपीठ ,व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व व्यासपीठासमोरील बंधू भगिनी ... ...... . . . . . ...... ...... "दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला , तारे फुलले , रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली . " कवीवर्य नारायण सुर्वे म्हणतात त्याप्रमाणे आम्ही भाकरीचं वर्तुळ सांधण्यामध्ये उभं आयुष्य खर्च करत असू तर आयुष्य सजवायचं कधी आणि फुलवायचं कधी हा प्रश्न तरुणांना पडल्याशिवाय राहणार नाही. अलीकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये पदव्याची भेंडोळी घेऊन बेकारीचा शिक्का माथी मारला जातोय.कविवर्य अर्जुन डांगळे यांच्या शब्दात सांगायचे म्हटले तर - "जगत आहोत हे जिणे जगावे ...